उशीखालच्या ह्या रुमालात
कुठला स्पर्श शोधु
घड़ी घातलेले अंथरुण
अजुन लोळत पडले आहे
कुणाच्या डोळ्यावर
दोन थेंब पाणी शिपंडू?
तो कंगवा मख्ख
त्या आरश्याकडे पाहत बसलाये
जणु अजुन सकाळ व्हायचीये
कुठल्या गप्पांमधे
कपाट गुतंलाये
किती आवरावर अजुन व्हायचीये।
पंखा हा जुनाट
नेहमीसारखं गरगरत थकलाये
तरी घामाचा एकही बिंदु
अंगावर नाही
विजेचं बटन घालवायला
कुणी साफ़ विसरलय।
दार अस उघडं
मोकळं आकाश घेवुन
भिंतीच्या पाटीला टेकलय
नशीब या फर्शीने
आतावर तरी
माझं वजन पेलवलय।
Monday, November 23, 2009
Thursday, November 19, 2009
कृपार्थीक
आज रात्र किती प्रकाशमय
सोबत रातराणीची
सुवास या पहाटेचा
दरवळतोये ह्या गगनी।
सुर्याची कोमल किरणे
डोकावतायेत त्या टेकडीमागुनी
पक्षी सोडतायेत घरटी
भरारी एकच नवी।
गजबजले हे सारे रस्ते
सडे नी रांगोळ्यांनी
प्रभातिक हे दृश्य
मनोहर ह्या भुवनी।
कांतीला स्नान
स्मरण माझ्या प्रभुचे
सुरेख असा मी ओसंडून वाहतोये
कृपार्थीक या जगती।
सोबत रातराणीची
सुवास या पहाटेचा
दरवळतोये ह्या गगनी।
सुर्याची कोमल किरणे
डोकावतायेत त्या टेकडीमागुनी
पक्षी सोडतायेत घरटी
भरारी एकच नवी।
गजबजले हे सारे रस्ते
सडे नी रांगोळ्यांनी
प्रभातिक हे दृश्य
मनोहर ह्या भुवनी।
कांतीला स्नान
स्मरण माझ्या प्रभुचे
सुरेख असा मी ओसंडून वाहतोये
कृपार्थीक या जगती।
Monday, November 16, 2009
दिवस
मी मृत आहे
नी निजलेला
जाणीव नसे ज्याला
आज दिवस कुठला।
रवी आहे उभा
काळ सरकत ठाई
काटे गोल का फिरतात
मज उमजत नाही।
किती समज कुणी
जरी पुढ्यात मांडिली
संवेदनेचा संवाद आता
पडद्यावर उमटत नाही।
पाउलांच्या आठवणी
ठश्यात विरुनी गेल्या
समुद्राच्या घडित
आता आवेग नाही।
अंतर किती आज
मी गाठीले आहे
मी आहे तोच जुना
हा प्रश्नच उरत नाही।
बाकी आहे काही
या भागाकारात सख्या
तुझ्या या शब्दानां मात्र
अर्थाची सावली नाही।
या अंधारात सारे
हरवून बसलो
आता चांदणीचा उजेड
मला भावत नाही।
ज्या नक्षत्रात
आपण कधी रमलो - हरपलो
आता तो मौसम परतणे
शक्य नाही।
जे होते भाग्यी
ते सारे जीवन जगलो
आता या रात्रीत नवीन
दिवस नाहीत।
नी निजलेला
जाणीव नसे ज्याला
आज दिवस कुठला।
रवी आहे उभा
काळ सरकत ठाई
काटे गोल का फिरतात
मज उमजत नाही।
किती समज कुणी
जरी पुढ्यात मांडिली
संवेदनेचा संवाद आता
पडद्यावर उमटत नाही।
पाउलांच्या आठवणी
ठश्यात विरुनी गेल्या
समुद्राच्या घडित
आता आवेग नाही।
अंतर किती आज
मी गाठीले आहे
मी आहे तोच जुना
हा प्रश्नच उरत नाही।
बाकी आहे काही
या भागाकारात सख्या
तुझ्या या शब्दानां मात्र
अर्थाची सावली नाही।
या अंधारात सारे
हरवून बसलो
आता चांदणीचा उजेड
मला भावत नाही।
ज्या नक्षत्रात
आपण कधी रमलो - हरपलो
आता तो मौसम परतणे
शक्य नाही।
जे होते भाग्यी
ते सारे जीवन जगलो
आता या रात्रीत नवीन
दिवस नाहीत।