Thursday, June 12, 2008

कहाणी

कहाणी
ढगांचा काळोख
त्यात गर्जना वीजेच्या,
कुणी सम्राट जणू
स्वारीवर आलाये;
झौपलेल्या जगाला
जींकायला नीघालाये
कुणीही वाटेत आला
की कत्तल सेना करते,
वायुचे शस्त्र भुमीवरती
कल्लोळ असा माजवते;
नतमस्तक सारे
भूमीगत झाले,
वादळ आले रे आले म्हणत
गुहेत कुण्या शीरले
पादाक्रांत धरणी सारी
रक्तबंबाळ होवून वाहीली,
सार्या जखमांचा दुःख
भोकांड पसरवून गायली
देवालाही मग थोडी
उशीराच जाग आली,
सूर्याला पाचारण करीत
सांत्वना दीली ।
मग कंबर कसून
माणसे वर आली,
चार पीके त्याने
चाहू बाजूला पेरली ;
धरणी मग कशी
फुलून हसली,
हीरवा रंग आपला
काळजात भरून बसली
वार्याने उड़ता उड़ता
कानात खबर टाकली,
सम्राटाची कहाणी
जरा एईकू घातली;
प्रेम होत सार समजताच
धरणी आकाशात भीडली,
माझे चुकले म्हणत
पाउंसाची वाट पाहत बसली

Wednesday, June 11, 2008

माणुस

माणुस
कधी कधी कागदासारखाच
माणुस ही कोरा राहतो,
जाणे की पाटीसारखा
हळूच पुसला जातो;
कमालच असेल ती शाई
जी गुणधर्मच वीसरून जाते,
अजबच असेल ते पाणी,
जे वाहतानां मातीही घेवून जाते
काहीतरी घडत
जे अशक्य असत;
कींवा काहीही घडत नाही
जे अपेक्षीत असत;
षणात कुणीतरी
समुदरात वीलीन होत,
अस्तीत्व होत जे
पाकळीवरच्या थेम्बांसारख
मातीचीच पाटी
नी झाडेही मातीचीच,
पाउंसाचेच थेम्ब
आणीक समुदराचाच पाउंस;
पाउंस मातीशी मीळून
कीमया करत राहतो,
कधी माणुस
तर कधी पुतळे बनवीत जातो
कुणी कीर्ती रुपे उरले
की फलक बनुन राहत,
दर पावसाळयात स्वच्छ धूवुन नीघत;
बाकी सारे मात्र
शांत पडून असतात,
मातीचा एक अंश बनुनूँ बसतात