Monday, November 16, 2009

दिवस

मी मृत आहे
नी निजलेला
जाणीव नसे ज्याला
आज दिवस कुठला

रवी आहे उभा
काळ सरकत ठाई
काटे गोल का फिरतात
मज उमजत नाही

किती समज कुणी
जरी पुढ्यात मांडिली
संवेदनेचा संवाद आता
पडद्यावर उमटत नाही

पाउलांच्या आठवणी
ठश्यात विरुनी गेल्या
समुद्राच्या घडित
आता आवेग नाही

अंतर किती आज
मी गाठीले आहे
मी आहे तोच जुना
हा प्रश्नच उरत नाही

बाकी आहे काही
या भागाकारात सख्या
तुझ्या या शब्दानां मात्र
अर्थाची सावली नाही

या अंधारात सारे
हरवून बसलो
आता चांदणीचा उजेड
मला भावत नाही

ज्या नक्षत्रात
आपण कधी रमलो - हरपलो
आता तो मौसम परतणे
शक्य नाही

जे होते भाग्यी
ते सारे जीवन जगलो
आता या रात्रीत नवीन
दिवस नाहीत

No comments: