कहाणी
ढगांचा काळोख
त्यात गर्जना वीजेच्या,
कुणी सम्राट जणू
स्वारीवर आलाये;
झौपलेल्या जगाला
जींकायला नीघालाये ।
कुणीही वाटेत आला
की कत्तल सेना करते,
वायुचे शस्त्र भुमीवरती
कल्लोळ असा माजवते;
नतमस्तक सारे
भूमीगत झाले,
वादळ आले रे आले म्हणत
गुहेत कुण्या शीरले ।
पादाक्रांत धरणी सारी
रक्तबंबाळ होवून वाहीली,
सार्या जखमांचा दुःख
भोकांड पसरवून गायली ।
देवालाही मग थोडी
उशीराच जाग आली,
सूर्याला पाचारण करीत
सांत्वना दीली ।
मग कंबर कसून
माणसे वर आली,
चार पीके त्याने
चाहू बाजूला पेरली ;
धरणी मग कशी
फुलून हसली,
हीरवा रंग आपला
काळजात भरून बसली ।
वार्याने उड़ता उड़ता
कानात खबर टाकली,
सम्राटाची कहाणी
जरा एईकू घातली;
प्रेम होत सार समजताच
धरणी आकाशात भीडली,
माझे चुकले म्हणत
पाउंसाची वाट पाहत बसली।
No comments:
Post a Comment