माणुस
कधी कधी कागदासारखाचमाणुस ही कोरा राहतो,
न जाणे की पाटीसारखा
हळूच पुसला जातो;
कमालच असेल ती शाई
जी गुणधर्मच वीसरून जाते,
अजबच असेल ते पाणी,
जे वाहतानां मातीही घेवून जाते।
काहीतरी घडत
जे अशक्य असत;
कींवा काहीही घडत नाही
जे अपेक्षीत असत;
षणात कुणीतरी
समुदरात वीलीन होत,
अस्तीत्व होत जे
पाकळीवरच्या थेम्बांसारख ।
मातीचीच पाटी
नी झाडेही मातीचीच,
पाउंसाचेच थेम्ब
आणीक समुदराचाच पाउंस;
पाउंस मातीशी मीळून
कीमया करत राहतो,
कधी माणुस
तर कधी पुतळे बनवीत जातो।
कुणी कीर्ती रुपे उरले
की फलक बनुन राहत,
दर पावसाळयात स्वच्छ धूवुन नीघत;
बाकी सारे मात्र
शांत पडून असतात,
मातीचा एक अंश बनुनूँ बसतात।
No comments:
Post a Comment